अकोला-- अकोला शहराचे वैभव वृद्धिंगत करण्यासाठी गांधी जवाहर बागेतील महात्मा गांधीजींच्या स्मृती संवर्धन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार साजिद खान पठाण यांनी केले.. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी /हुतात्मादिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने आयोजित सूत कताई यज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमात बोलत होते. सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, प्रा. राजाभाऊ देशमुख ,विजय कौसल, अँड. विलास वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधी जवाहर बागेत सकाळी नऊ वाजेपासून सूत कताई यज्ञ करण्यात आला. सर्वोदयी कार्यकर्त्यांनी चरख्यावर सूत कताई करून गांधीजींच्या स्मृतीस कृतिशील आदरांजली वाहिली. सर्वश्री प्रल्हादराव नेमाडे,डाॅ.मिलिंद निवाणे,श्रीकृष्ण विखे पाटील,अनिल मावळे,वासुदेवराव काळमेघ, श्रीमती सुमित्रा निखाडे, रामचंद्र राऊत बाबुळगाव ,संजय इंगळे, श्रीकृष्ण माळी ,डॉ. गुरुचरण ठाकूर, पार्थ उत्तम गिरी खडकी, संजय मालोकार, रामराव पाटेखेडे,रोहित तारकस,हिम्मतराव गावंडे,आकाश इंगळे, साहेबराव तायडे ,शंकरराव सरप यांनी चरख्यावर सूत कताई करून आदरांजली वाहिली.
0 Comments